पाणी फाउंडेशन च्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जाणार आहेत. ज्या शेतीमध्ये फारसं काही पिकत नाही. अशी शेत जमीन राज्य सरकार 30 वर्षासाठी भाड्याने घेणार आहे. शेतकऱ्यांना त्या बदल्यात मोबदला देखील दिला जाणार आहे. यासाठी एक एकरला 75 हजार रुपये दिले जाणार आहेत.
एवढेच नव्हे तर प्रत्येक वर्षी दोन टक्के रक्कमेमध्ये वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान या प्रकल्पातून शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्यात येणार आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.