Karjmafi | शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर कर्जमुक्ती साठी एक हजार कोटी रुपयांची घोषणा

Karjmafi

Karjmafi: राज्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अवघ्या 5 महिन्यांमध्ये 4 हजार 700 कोटी रुपयांचे वाटप होणार आहे. शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ मिळणार आहे.

राज्य सरकारने 29 जुलै रोजी शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा निर्णय घेतला होता. 29 ऑगस्ट रोजी कर्जमुक्ती योजनेसाठी चार हजार सातशे कोटी रुपयांची घोषणा केली होती.

16 सप्टेंबर रोजी 2350 कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला.

18 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या हप्त्यापोटी 650 कोटी मंजूर करण्यात आला. 17 जानेवारीला तिसऱ्या हप्त्यापोटी 700 कोटी मंजूर करण्यात आले.आता राज्य सरकारकडून शिल्लक 1000 कोटी रुपये मंजूर करण्या आले आहे. शिंदे सरकारच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना लवकरच लाभ मिळणार आहे.

Leave a Comment